Thursday, March 10, 2011

तुझी आठवण

ना, तू, ना, मी
ना आपण
काहीच नाही राहिले
भूतकाळात सारे असेच घडून गेले
राग होते, रूसने होते
सारे काही फसवे होते
माझ्या फजेतीवर
सारेजण हसले होते.
भविष्य काळातील स्वप्नं सारी
उध्वस्तं होत चालली आहेत
एका मागून एक असं विचित्र घडत आहे.
कधी असं झालं तर,
स्वतःला मी सावरत असतो.
आपल्या बरोबर कुणीच नाही, म्हणून मन ही रडत असतं
अश्रूही थांबत नाही
ते आपली वाट मोकळी करतात
स्वतःचे दुःख ते माझ्या नेत्रातून सांडतात
येवढं मात्र खरं
ते फक्त तुझीच आठवण काढतात...

No comments:

Post a Comment